अमळनेरकरांचा उत्स्फूर्त जनसमर्थन; ‘जितू ठाकूर विजयी’चा नारा अधिक बुलंद..
आबिद शेख/अमळनेर
अमळनेर –नगराध्यक्ष पदासाठी शहर विकास आघाडीचे उमेदवार श्री. जितेंद्र (जितू) हरिश्चंद्र ठाकूर यांच्या प्रचार मोहिमेला नागरिकांकडून मिळत असलेला प्रचंड उत्स्फूर्त आणि स्वयंस्फूर्त प्रतिसाद पाहता, त्यांच्या विजयाचा झेंडा फडकणे निश्चित झाल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

प्रत्येक परिसरात, प्रत्येक गल्लीबोळात, वृद्ध, तरुण, महिला आणि व्यापारी वर्ग अशा सर्व स्तरांतील नागरिकांकडून मिळणारा अभूतपूर्व प्रतिसाद पाहून जितू ठाकूर हे खरे ‘जनता उमेदवार’ असल्याचे चित्र उभे राहत आहे. नागरिकांना ते आपल्या परिवारातील एक सदस्य असल्याची जिव्हाळ्याची भावना निर्माण करतात, हा त्यांचा सर्वात मोठा गुणधर्म असल्याचे मत नागरिक व्यक्त करीत आहेत.
जितू ठाकूर यांच्या साधेपणाने, मनमिळाऊ स्वभावाने आणि सर्वांना आपलेसे करून घेण्याच्या वृत्तीने त्यांनी अमळनेरकरांची मने जिंकली आहेत. प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचणारा त्यांचा संवाद, समस्यांची जाण आणि त्या सोडविण्यासाठीची धडपड यामुळे शहरात एक वेगळ्या प्रकारचा सकारात्मक उत्साह निर्माण झाला आहे.
अमळनेर नगरपालिकेचे भवितव्य प्रामाणिक, विश्वासार्ह आणि सर्वासाठी सर्वकाळ उपलब्ध असलेल्या नेतृत्वाच्या हातात द्यावे, अशी भावना आता स्वतः नागरिकांतून उमटत आहे. तरुण, ऊर्जावान आणि विकासाभिमुख नेतृत्व म्हणून जितू ठाकूर हे अमळनेरचा विकासाचा त्रिसूत्री कार्यक्रम राबवतील, असा ठाम विश्वास मतदारांमध्ये निर्माण झाला आहे.
शहराचा सर्वांगीण विकास, नागरिकांच्या मूलभूत सोयी-सुविधांचा विस्तार आणि प्रामाणिक प्रशासन या तत्त्वांवर ठाकूर यांची प्रचारयात्रा सुरु आहे. या प्रवासाला मिळत असलेले प्रचंड जनसमर्थन पाहता त्यांच्या विजयाची शक्यता नव्हे तर विजय निश्चित झाल्याचे राजकीय वर्तुळातही चर्चिले जात आहे.
आताचा प्रश्न फक्त विजयाचा नाही, तर प्रचंड बहुमताने विजय मिळवणे हा आहे. या साठी प्रत्येक समर्थक, कार्यकर्ते आणि नागरिकांनी पुढील काळात अधिक जोमाने काम करावे, असा संदेशही ठाकूर समर्थकांनी दिला आहे.
अमळनेरमध्ये बदलाची हवा जोर धरत असून,
“जितू ठाकूर विजयी – अमळनेर विकसित”
हा नारा आता अधिक बुलंद होताना दिसत आहे.
