प्रभाग १ (अ) मध्ये ‘शिटी’ची गूंज : राजपूत कविता विजय यांच्या उमेदवारीने राजकीय वातावरण तापले..

0
New-Doc-12-18-2025-23.54.jpg

अमळनेर | प्रतिनिधी

अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १ (अ) सर्वसाधारण महिला राखीव मतदारसंघातून राजपूत कविता विजय यांच्या उमेदवारीने प्रभागातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यांच्या उमेदवारीनंतर प्रभागात चर्चांना वेग आला असून, विशेषतः महिला व युवक मतदारांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

महिलांचा वाढता विश्वास : लोकप्रियतेला वेग

शिटी” या निवडणूक चिन्हावर मैदानात उतरलेल्या कविता विजय यांनी महिला सक्षमीकरण, आरोग्य, स्वच्छता, शिक्षण व सुरक्षा यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर ठाम भूमिका मांडली आहे. महिलांच्या दैनंदिन समस्यांवर थेट संवाद साधत, त्या उपाययोजनांची स्पष्ट दिशा मांडत असल्याने महिला मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वास वाढताना दिसत आहे. साधेपणा, सहज उपलब्धता आणि प्रामाणिक भूमिका यामुळे स्थानिक महिलांचा त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे.

युवकांसाठी ठोस विकासदृष्टी

प्रभागातील रस्ते दुरुस्ती, नळपाणी योजना, कचरा व्यवस्थापनाची प्रभावी अंमलबजावणी, तसेच मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. यासोबतच युवकांसाठी क्रीडा साहित्य उपलब्धता, रोजगार मार्गदर्शन व कौशल्य विकास उपक्रम राबवण्याचा संकल्प त्यांनी मांडला आहे. त्यामुळे त्यांच्या प्रचारसभांना युवकांची मोठी गर्दी होत असून, सक्रिय सहभाग वाढताना दिसत आहे.

महिला नेतृत्वाला मिळालेली नवी दिशा

प्रभागात महिलांच्या प्रश्नांवर सातत्याने काम करणाऱ्या प्रभावी नेतृत्वाची कमतरता जाणवत होती. राजपूत कविता विजय यांच्या उमेदवारीमुळे ही पोकळी भरून निघेल, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत. महिला नेतृत्वाला मिळालेल्या या नव्या बळामुळे निवडणुकीत निर्णायक घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

‘शिटी’ निशाणीवर विजयाची चर्चा

अलीकडील प्रचारदौरे, घरफेरीतील उत्साह, महिलांचा वाढता सहभाग आणि युवकांचा भक्कम पाठिंबा पाहता प्रभाग १ (अ) मध्ये शिटी निवडणूक चिन्ह अधिक मजबूत स्थितीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. स्थानिक वातावरण पाहता त्यांच्या विजयाबाबत मतदारांमध्ये सकारात्मकता स्पष्टपणे दिसून येत आहे.

मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा निर्धार

प्रभागाचा सर्वांगीण विकास, स्वच्छ व सुरक्षित परिसर, महिलांसाठी सुलभ सुविधा आणि युवकांसाठी संधी निर्माण करणे हेच माझे ध्येय आहे,” असा निर्धार राजपूत कविता विजय यांनी व्यक्त केला आहे. प्रामाणिक कामगिरीच्या जोरावर जनतेच्या अपेक्षांना न्याय देण्याचा त्यांचा ठाम मानस असल्याचे त्या सांगतात.

अमळनेरच्या राजकीय चित्रात प्रभाग १ (अ) हा यंदा विशेष लक्ष वेधून घेत असून, येत्या काळात येथील लढत एकतर्फी होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed